Powered By Blogger

Thursday, January 13, 2011

मकरसंक्रांत

सर्वप्रथम आपणा सर्वाना राणे परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !! मकरसंक्रांत
मकरसंक्रांत हा भारतातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे. या दिवशी सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकतो म्हणून या सणास उत्तरायण (उत्तर - उत्तर दिशा,आयन म्हणजे अवकाशात
सरकने) असेही म्हणतात. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. भारतात विविध ठिकाणी या सणास विविध नावे आहेत. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांती (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांती (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्रजी महिन्यानुसार हा दिवस १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देह त्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो. उत्तरायणात मरण आल्यास मोक्ष प्राप्त होतो अशी समजूत आहे.मकर संक्रांतीपासून खरेतर उन्हाळ्याची सुरुवात होते. या वर्षी संक्रांति १५ जानेवारी(नेहमी १४ जानेवारीला असते) ला आहे म्हणजे अवघ्या ७० वर्षांनी ती एक दिवस पुढे सरकली आहे. उद्या संक्रांति आहे आणि पुण्यकाल सकाळी ७.१६ वाजेपासून ते संध्याकाळी ६.१९ पर्यंत आहे. या काळाच्या बरोबर मध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे, पुण्याकालात केलेली दान धर्म पुण्य देवून जातात. चला तर मग मित्रानो आपण सोबत साजरी करूयात आनंदाची मकरसंक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला".
"

No comments:

Post a Comment